20 November 2010

मैत्री

जीवनाच्या या प्रवाहात
सवंगडी हरवले जातात,
आठवणीही काही काळाने
पुसटश्या होवून जातात.


प्रत्येक टप्प्यात नवीन
नाती मिळत जातात,
भेटीअंती निखळ मैत्रीचे
क्षण टिकून रहातात.


सर्व मैत्रीमधून
अनुभवाचे बोल भेटतात,
प्रत्येक नात्यातून निराळ्या
जीवनाची भाषा समजावतात.


विचारांच्या भागीदाराने
उनसावलीचे वाटेकरी बनतात,
नात्यातला शुद्धपणा
टिकवण्याचा प्रयत्न करतात.


सुदैवी तोच ज्याला
खऱ्या मैत्रीचे हात मिळतात,
जीवनाच्या चढउतारावर
त्याच्यासाठी सावली बनतात.

1 comment:

Unknown said...

really nice...