03 February 2011

धागा तुटताना

विवाहापूर्वी जोडीदाराचे
स्वप्नचित्र वेगळेच असते,
कल्पवृक्षाची, प्रेमाची
ती सावली वाटते.


काही कालावधीसाठी
चित्र खरे वाटते,
स्वप्नांच्या जगात
हरवून जावेसे वाटते.



दिवस पुढे सरकतात
आयुष्याची दिशा बदलते,
एकमेकांच्या कमजोरीला
लक्ष्य बनवले जाते.


वाद वाढतात, विकोपाला जातात
मन समजूत काढते,
पोकळी वाढत जावून
दरी तयार होते.


अतूट प्रेम असूनही
पटवणे अवघड होते,
तुझ्याविना जगणे अशक्य
सांगणे कठीण जाते.


निस्वार्थ प्रेमाची जागा
कर्तव्याने घेतली जाते,
आसवेही निष्फळ ठरतात
रुदय धडधडू लागते.

आधार कमकुवत झाल्याची
कुठेतरी जाणीव होते,
प्रेम आटत गेल्याने
पोरकेपणाची चाहूल लागते.



मनाची घुसमट वाढत
सहनशक्ती येत राहते,
हेच जीवन आहे समजून
मनही घायाळ होते.

1 comment:

vivek said...

i love this... its a true fact.........