23 November 2010

घुसमट

खूप काही बोलायचे होते
ते मनातच राहून गेले,
शांत घटीकेची वाट बघत
ओठच नि:शब्द होऊन गेले.


तू भेटल्यानंतरचे स्वप्न
बघण्यापुर्वीच अंधुक झाले,
मधेच वावटळ आली नि
शरीरच गारठून गेले.


दुखापातीनंतरच्या वेदना
तुला सांगायचे विसरून गेले,
तुझ्या कुशीत विसावण्याचे
ठरवलेलेही विसरून गेले.


कधी कधी जाणीव होते
तुझ्यावर मी अवलंबून राहिले,
मागे वळून पहिले तर
माझे विश्वच नष्ट झाले.


दोष कोणाचाही नसताना,
वाईट क्षण येऊन गेले,
स्थिर असणाऱ्या घडीला
पुन्हा विस्कटून गेले.

No comments: